चोपडा नगरपरिषदेमार्फत वेस्ट टू वेल्थ संकल्पनेतून जीवीपी पॉईंटवर मात

चोपडा / महेश शिरसाठ :- नगर परिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सदर अभियानाच्या निकषांची पूर्तता करणे नगर परिषदेस आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदेमार्फत विविध कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरांमध्ये नागरिक विविध ठिकाणी वारंवार दैनंदिन कचरा फेकतात यामुळे कचऱ्याचे ढीग (GVP Point) निर्माण होतात आणि शहरातील सौंदर्य खालावते. परंतु सदरची बाब लक्षात घेता चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार चोपडा नगर परिषदेचे विविध ठिकाणी अशा स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. तरी अशा परिसरांची दैनंदिन स्वच्छता करण्यात येवून त्या जागेवर सुशोभिकरण करण्याचे काम चोपडा नगर परिषदेने हाती घेतलेले आहे. यात पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात चौथरा बांधून यावर भंगार रिक्षेपासून नाविन्यपूर्ण रंगरंगोटी करून सुशोभिकरण करून त्या चौथ्यावर ठेवण्यात आलेले आहे व सोबतच याबाबतची सूचना फलक देखील नगर परिषदेमार्फत नागरिकांकरीता लावण्यात आलेला आहे. या चौकाचे अनावरण मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले. या कार्यक्रमात फलकावर फित कापुन उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमप्रसंगी मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी नागरींकाना उद्देशुन संबोधले की, अभियान राबवित असतांना नगर परिषदेस नागरिकांच्या सहकाऱ्याची देखील आवश्यकता आहे, कारण हे चौक सुशोभिकरण झाल्यानंतर कोणत्याही नागरिकांनी या परिसरामध्ये पुन्हा कचरा टाकून कचऱ्याचा ढिग निर्माण न होण्याची काळजी ही नागरिकांनीच घेतली पाहिजे, ज्यामुळे त्या परिसरात रस्त्यांचे किंवा परिसराचे सौंदर्य हे कायम टिकून राहील व शहराच्या सौंदर्यीकरणाच्या मानांकनात वाढ होईल व मला खात्री आहे की चोपडा शहरातील नागरिक याकरिता विशेष असे सज्ज असतील. या चौकात ठेवलेल्या वस्तू रिक्षा ही रंगरंगोटी करून याद्वारे संदेश देण्यात आलेला आहे. वेस्ट टू वेल्थच्या माध्यमातून त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्यामुळे वेस्ट रिडक्शन ही संकल्पना वाढीस लागून नागरिकांमध्ये RRR (Reduce-Reuse-Recyle) ही संकल्पना पोहोचावी त्याचप्रमाणे वस्तूचे सुशोभिकरण करून कचऱ्याच्या GVP Point वर ठेवल्यानंतर त्या परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल व नागरिकांमध्ये जनजागृती देखील करणे हा नगर परिषदेचा मुख्य उद्देश आहे. 

या मोहिमेत मुख्याकारी राहुल पाटील, स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके, जयेश भोंगे, शहर समन्वयक स्वप्निल धनगर यांनी सदर कार्यक्रमाकरीता परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास उपमुख्याधिकारी संजय मिसर, कर अधिकारी संदिप गायकवाड, प्रणव पाटील, अक्षय चौधरी, मिळकत व्यवस्थापक संजय ढमाळ, विद्युत अभियंता मंगेश जंगले, संगणक अभियंता अंकुश पाटील, परिसरातील नागरीक निलेश वाघ व इतर नागरीक सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post