* कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मांडण्यात आल्या व्यथा
* प्रकल्पग्रस्तांना योग्य 'तो' न्याय देण्याची मागणी
खोपोली / प्रतिनिधी :- कोयना धरण बांधताना कोयना परिसरातील रहिवासी यांची महाराष्ट्र शासनाने जागा हस्तांतरीत करून कोयना धरण बांधले. परंतु संबंधित काही शेतकरी व नागरीक यांना 'त्या' जागेच्या बदल्यात शासकीय नियमाप्रमाणे पर्यायी जागा देणे होते व आर्थिक मदत करणे होते. मात्र, आज अनेक वर्ष झालेले असता सुद्धा संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. याकरीता आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
या भेटी दरम्यान प्रदेश सचिव तुषार कांबळे यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्याकडे मांडल्या. यावेळी तुषार कांबळे यांनी सांगितले की, कोयना धरण बांधताना कोयना परिसरातील रहिवासी यांची महाराष्ट्र शासनाने जागा हस्तांतरीत करून धरण बांधले. परंतु संबंधित शेतकरी व नागरीक यांना 'त्या' जागेच्या बदल्यात शासकीय नियमाप्रमाणे पर्यायी जागा मिळाली नाही. तसेच आर्थिक मदतीपासून देखील अनेक कुटुंब वंचित आहेत. शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेले नाही. अनेक मागण्या अद्यापपर्यंत मान्य करण्यात आलेल्या नाहीत, मागील ब-याच वर्षापासून शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. तरी मंत्री महोदय आपण कोयना प्रकल्पग्रस्तांना तत्काळ योग्य तो न्याय मिळवून द्यावा, असे लेखी निवेदन देखील देण्यात आले. याप्रसंगी शेखर गोयल, अपर्णा म्हेत्रे, सागर जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.