कमलबाई सखाराम जाधव ह्यांचे अल्पशा आजाराने निधन

 

खालापूर / दिपक जगताप :- खालापूर तालुक्यातील आंबिवली गावात राहणारी वै. ह. भ. प. कमलबाई सखाराम जाधव यांचे राहत्या घरी रविवारी दि. १३ जुलै, रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या वयाच्या ६९  वर्षाचे होत. त्यांच्या अंत्यविधीत सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                                       

 ्त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली. सर्व समाजामध्ये ऐक्यांचे, बंधुत्त्वाचे, शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरीता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्तीवर मोठी श्रद्धा होती. अशी व्यक्ती सोडून गेल्याने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. २२ जुलै रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर येथे होणार आहे. तसेच त्यांचे उत्तरकार्य गुरुवारी २५ जुलै रोजी, आंबिवली (माजगांव) त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह. भ. प. रामदास महाराज पाटील खोपोली (गुरुकुल संस्था महड) यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणार आहे.        

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मनोहर सखाराम जाधव, राजेश सखाराम जाधव, मुली, बहिणी, सुना, नातवंडे, पंतवडे, जावई असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post